गेल्या २५ वर्षांपासून श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव हे ग्रामीण भागात सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध शासकीय प्रकल्प यशस्वीपणे राबवत आहे.
१. महिलांचा सशक्तीकरण व आर्थिक समावेशन:
बचत गटांना बळकट करून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता व स्वावलंबन वाढवणे.
प्रगत कौशल्य प्रशिक्षणाद्वारे उद्यमशीलतेला चालना देणे.
२. शाश्वत शेती आणि जलसंधारण:
जलसंधारण प्रकल्पांचा विस्तार करून दुष्काळप्रवण भागांना मदत करणे.
सेंद्रिय व शाश्वत शेतीच्या पद्धती प्रचारित करणे.
३. पर्यावरण संवर्धन व जनजागृती:
वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन व हवामान बदल यावर जागरूकता अभियान राबवणे.
४. आरोग्य आणि कल्याण:
नियमित आरोग्य व रक्तदान शिबिरे, पोषण मोहिमा व जनजागृती उपक्रम.
जीवनशैलीशी संबंधित आजारांविषयी शिक्षण.
५. शिक्षण आणि कौशल्य विकास:
व्यवसायिक व तांत्रिक प्रशिक्षण, डिजिटल साक्षरता व ई-लर्निंग साठी संधी निर्माण करणे.
शिक्षण सोडलेल्यांसाठी शैक्षणिक सहाय्य पुरवणे.
६. सामाजिक विकास व समावेश:
सामूहिक सक्षमीकरण व लिंग समानता वाढवणे.
वृद्ध व दिव्यांगांना सहाय्य पुरवणे.
७. भागीदारी व क्षमता वाढ:
शासकीय, CSR व स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी व ग्रामीण स्वयंसेवकांसाठी कार्यशाळा.
केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना प्रत्यक्ष राबवून ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल याबाबत कार्य करणे